Type Here to Get Search Results !

जलसिंचनाचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात विशेष व स्वतंत्र बैठक संपन्न

जलसिंचनाचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी  मंत्रालयात विशेष व स्वतंत्र बैठक संपन्न 

       अक्कलकुवा तालुक्यातील वर्षानुवर्षे जलसिंचनाचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी  मंत्रालयात विशेष व स्वतंत्र बैठक संपन्न झाली.

         राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या दालन क्र.606 येथे बैठक झाली या बैठकीला विधान परिषदेचे सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी, अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपुर, मुख्य अभियंता बोरकर, अधिक्षक अभियंता सोनवणे, आदीं अधिकारी उपस्थित होते. 

                 यावेळी अक्कलकुवा तालुक्यातील रामपुर लघु प्रकल्पात विस्थापित झालेल्या प्रकल्प ग्रस्तांचे विविध प्रश्न तसेच  वर्षानुवर्षा पासुन निधी अभावी  प्रलंबित असलेल्या रामपुर प्रकल्पाचे शासनाने दायित्व स्वीकारुन तो लवकरात लवकर पुर्ण करावा, देहली प्रकल्पात भूमिहीन झालेल्या 102 भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत जमिनी द्याव्या, ज्यांना अद्याप ही राहण्यासाठी घराचे प्लॉट देण्यात आलेले नाही त्यांना तातडीने प्लॉट वितरित करण्यात यावे तसेच धडगाव तालुक्यातील जलोला प्रकल्पाविषयी चर्चा करुन त्या प्रकल्पाच्या समस्यांच्या निराकरणाची मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे केली. 


यावर मंत्री महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित प्रकरणात तातडीने लक्ष घालुन त्या योजना पुर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उईके यांच्या सोबत दुरध्वनी वर चर्चा करुन देहली प्रकल्पाच्या भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत शेतजमीन मिळण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला असल्याचे सांगत या प्रस्तावांवर लवकरात कार्यवाही करुन मार्ग काढण्याचे सांगितले. 

      यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील नंदुरबार तालुक्यातील प्रलंबित तापी बुराई प्रकल्पावर चर्चा करुन तो लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी डीपीआर तयार करण्याच्या सुचना करत सदर प्रकल्पाचे पाणी ठाणेपाडा पर्यंत नेण्यासाठी सर्व्हे करण्याची मागणी केली. या सर्व जलसिंचनाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामुळे येत्या काळात तालुक्यातील जलसिंचनाच्या समस्यांना चालना मिळणार असुन त्या सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बैठकीला जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, देहली प्रकल्पाचे उप अभियंता किशोर पावरा,आमदार आमश्या पाडवी यांचे स्विय सहाय्यक रविंद्र गुरव आदीं उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments