तळोद्यात जनता दरबार नागरिकांनी मंडल्या समस्यांचा पाढा ;समस्या मार्गी लावण्यासाठी विभाग प्रमुखांना अल्टिमेटम
तळोदा शहरातील नागरिकांसाठी त्यांच्या अडचणी, समस्या व प्रश्न थेट मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आला. शहरातील नागरिकांनी समस्या, प्रश्न मांडल्यात.
जनता दरबाराच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी हे होते. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, अजय परदेशी, बळीराम पाडवी, जितेंद्र सूर्यवंशी, कैलास चौधरी, दरबार पाडवी, गौरव वाणी, नारायण ठाकरे, प्रदीप शेंडे, कांतीलाल पाडवी, अनिल माळी, अनिल परदेशी, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्यधिकारी विक्रम जगदाडे, नितीन वसावे, गटविकास अधिकारी किरवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, वनक्षेत्रपाल सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर रोहित वसावे, आदी व्यासपीठावर उपस्थित होती.
जनता दरबारात विज प्रश्न ट्रान्सफार्मर, वीज पोल आदी समस्या, पुरवठा विभाग- रेशन कार्ड, महसूल विभाग उत्पन्न दाखला जन्म मृत्यू नोंद व दाखला संदर्भात तहसील व पालिका समन्वय दिसला नाही. आधार कार्ड संदर्भात तक्रार, पालिकाचे आरोग्य साफसफाई, गटारी तुडुंब सफाई बाबत तक्रार नवीन वसाहतीत शर्मा नगरात गटार रस्ते नाही, चमारी हट्टीत गटारी नाही, पाणी पुरवठा बाबत, आदी सह अनेक समस्या मांडण्यात संबधित विभाग प्रमुख यांना समस्या प्रश्न सोडविण्याचे सांगितले.
तळोदा शहरात एक गल्लीत गेल्या वीस वर्षांपासून पालिका चे दुर्लक्ष मुळे पथ दिवे नसल्याने अंधार असल्याने याभागाला अंधार प्लॉट नाव पडले यामुळे दरबारात एकच हष्य पिकला आमदार राजेश पाडवी यांनी दोन दिवसात सौर दिवे व वीज पोल ची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी शहरातील पाण्याच्या प्रश्नाचे लवकर समाधान करणार, घरकुल व बारगळ जहागिरदारीच्या प्रश्ना वर आदिवासी विकास मंत्री यांना तळोदा दौऱ्या वर बोलावले आहे. व दोघी प्रश्नाचे मार्ग काढू असे आश्वासन आमदार राजेश पाडवी यांनी दिले. सरकारच्या सर्व योजना जनसामन्या पर्यंत पोचवू , गटारीचे प्रश्न लवकरच मार्गी लाऊ, पथदिवे वीज प्रश्न असेल तो देखील आपण लवकरात लवकर सोडवणूक करु.असे म्हणाले. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी व आधिकऱ्यानी नागरिकांनी मांडलेल्या समस्या तक्रारी,व प्रश्न सोडविण्याल्याचा अहवाल एक महिन्यात द्यावा असे शेवटी आमदार राजेश पाडवी यांनी सूचना दिल्यात.
सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले.
Post a Comment
0 Comments