Type Here to Get Search Results !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून भाविकांसाठी विशेष रेल्वे ; यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ जळगावहून पंढरपूरकडे सुमारे २ हजार भाविक रेल्वेने रवाना टाळ, मृदुंग, अभंगाच्या गजरात रेल्वे स्थानकात उत्सवाचे वातावरण

 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून भाविकांसाठी विशेष रेल्वे ;  यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ

जळगावहून पंढरपूरकडे सुमारे २ हजार भाविक रेल्वेने रवाना

 टाळ, मृदुंग, अभंगाच्या गजरात रेल्वे स्थानकात उत्सवाचे वातावरण

                  जळगाव, : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या पंढरपूर यात्रेसाठी, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सुमारे दोन हजार भाविकांना स्वतंत्र रेल्वेने रवाना करण्यात आले. ही यात्रा  पालकमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज रात्री साडे नऊ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेला झेंडा दाखवून भाविकांना भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना करण्यात आले. या वेळी रेल्वे स्थानक परिसर  टाळ, मृदुंगाच्या गजरात व "ज्ञानोबा माऊली तुकाराम", "विठू माऊली तू माझा सखा" अशा अभंगांनी वातावरण भक्तिमय झाले होते.


सेवेची भावना, अध्यात्मिक जाणीव – उपक्रमामागील उद्देश

 जळगाव ग्रामीण मतदारसंघात अशा अनेक नागरिकांना विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आंतरिक ओढ असते. परंतु वयोमान, आर्थिक अडचणी किंवा तब्येतीची कारणे यामुळे अनेकांना ही वारी करणे शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी, विशेषतः ५० ते ६५ वयोगटातील नागरिकांसाठी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून ही विशेष रेल्वे यात्रा नियमितपणे आयोजित केली जात आहे.


उत्कृष्ट नियोजन आणि सेवा-सुविधा

 यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद मा. सदस्य प्रतापराव पाटील आणि त्यांच्या टीमने परिपूर्ण नियोजन केले. भाविकांच्या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या:

भोजन व्यवस्था: रेल्वे प्रवासादरम्यान सकस आणि शुद्ध अन्न, नाश्ता, चहा यांचे वेळापत्रकबद्ध वितरण.

पिण्याचे पाणी: शुद्ध पाण्याच्या बाटल्या सर्व भाविकांना उपलब्ध.

औषधोपचार: प्रवासादरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित उपचारासाठी डॉक्टरांची टीम सोबत.


स्वच्छता आणि सुरक्षितता: रेल्वे डब्यांची स्वच्छता आणि भाविकांची सुरक्षितता यासाठी विशेष स्वयंसेवकांकडून व्यवस्था सांभाळली जाणार आहे.

दर्शनाचा प्रवास – वेळापत्रक

    भाविकांची रेल्वे १७ जून रोजी सकाळी जळगाव स्थानकावरून निघाली. १७ आणि १८ जून रोजी दोन दिवस पंढरपूर येथे मुक्काम आणि दर्शनाची व्यवस्था असून, १८ जून रोजी रात्री पंढरपूरहून सुटणारी ही विशेष रेल्वे १९ जून रोजी सकाळी जळगावमध्ये परत येणार आहे.


पंढरपूर ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक वारशाची राजधानी आहे. विठ्ठल भक्तीच्या मार्गाने समाजात सात्त्विकता, संयम आणि समाधान निर्माण होते. माझ्या मतदारसंघातील कोणीही भाविक विठ्ठल दर्शनास मुकू नये, हीच भावना घेऊन या यात्रेचे आयोजन केले आहे. हजारो भाविक सुखरूप पंढरपूरकडे रवाना झाले याचे समाधान आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी जे योगदान दिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे." अशी कृतज्ञतेची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


या यात्रेच्या आयोजनात शिवसेना, युवासेना, GPS ग्रुप, विकी बाबा ग्रुप, तसेच अनेक स्वयंसेवक व सामाजिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. झेंडा दाखवताना शिवसेना पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 या यात्रेची वैशिष्ट्ये – एका दृष्टीक्षेपात


✅ २ हजार भाविकांचा सहभाग

✅ खासगी खर्चातून स्वतंत्र रेल्वे सेवा

✅ दोन्ही दिवस भोजन, औषधे, डॉक्टरांची व्यवस्था

✅ पंढरपूर येथे दोन दिवसांचा मुक्काम व दर्शन

✅ १९ जून रोजी परतीचे आगमन

✅ पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून यात्रा प्रस्थान

प्रत्येक भाविकांचे पालकमंत्र्यांनी केलीच विचारपूस. 


या वारीमधून निर्माण होणारा भक्तिरस, एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा अनुभव हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा आहे. पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्याने भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसमोर एक अनुकरणीय आदर्श ठेवला आहे.

Post a Comment

0 Comments