Type Here to Get Search Results !

तळोदा येथे विचारांची जयंती साजरी करून अभिवादन

 तळोदा येथे विचारांची जयंती साजरी करून अभिवादन 


                                  तळोदा : येथे सुशीला श्रीराम पार्क,फुले,शाहू आंबेडकर विचारमंच,प्रज्ञासूर्य फाउंडेशन व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापुरुषांच्या विचारांची रुजवणूक करणारी जयंती साजरा करून अभिवादन करण्यात आले.

           याप्रसंगी काव्यवाचन व व्याख्यानाचा कार्यक्रम पूर्वसंध्येला पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.जयपालसिंग शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुरेश इंद्रजित,डॉ.डी.बी.शेंडे, संतोष केदार,डॉ.स्वप्निल बैसाणे, केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी, तारा मराठे,अशोक जाधव,मधुकर कापुरे,मनीलाल नावडे,विजय भामरे,प्रा.डॉ.प्रशांत बोबडे, मुकुंदा बोरसे आदींसह आदी मान्यवर उपस्थित होते. 

         कार्यक्रमात सुजाता साळवे, कांतीलाल पाडवी, अरुण कुमार यांनी कविता व गीते सादर केले. त्यानंतर आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात व्याख्याते म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे गौतम महिरे यांनी उपस्थित त्यांना संबोधित केले. आपल्या व्याख्यानात कमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष व हालअपेष्टा भोगून समाजाला सुटा बुटात आणल्याचे सांगितले. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन विचारांची जयंती साजरी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने विचारांची पेरणी करून अभिवादन करण्याचा निर्धार उपस्थितांकडून करण्यात आला.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री महाले,निशा पाडवी,अशोक गवळे, संतोष धनगर,ज्ञानेश्वर पाटील,श्यामप्रसाद आगळे यशवंत गवळे, रविराज बोरसे,जगदीश माळके,एफ.एम.पावरा,संजय राठोड यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हंसराज महाले यांनी केले तर सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी व आभार प्रदर्शन सुनील पिंपळे यांनी केले.



Post a Comment

0 Comments