शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा....
माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पद भरतीचे प्रमाण निश्चित करण्याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे अनुशेषाच्या नावाखाली थांबवण्यात आलेली शिक्षकेतर पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्य. शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी व अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेकर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पद भरतीचे प्रमाण निश्चित करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे अनुकंपा १००% व उर्वरीत ८०% पद भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अनुशेषाच्या नावाखाली थांबवण्यात आलेली शिक्षकेतर पद भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्य. शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर व नाशिक विभागीय कार्यवाह डी. पी. महाले यांनी दिली आहे.
दरम्यान या शासन निर्णयानुसार सर्व विभागीय आयुक्तांनी अनुशेष नोंदवही तपासून देण्याबाबत स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहे. अनुशेष तपासणी करुन पदभरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आजच्या या शासन निर्णयामुळे माध्यमिक शाळातील रिक्त असलेली शिक्षकेतर पद भरती सुरू होऊन त्यांना मान्यता देण्यासाठी सर्व संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनाही निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर पदभरती करण्यास मान्यता मिळाल्याने राज्यातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments